Mahesh Mhatre

गेल्या दोनेक वर्षापासून, जेव्हा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी होऊ लागली तेव्हा पुन्हा मराठी लोकांना ‘गाथा सप्तशती’ची आठवण झाली. डॉ. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती नेमून राज्य सरकारने मराठी कशी अभिजात भाषा ठरते, याचा अहवाल मागवला आणि त्याच गडबडीत उत्तम वाङ्मय प्रसिद्ध करणा-या अरुण जाखडे यांनी ‘गाथा सप्तशती’ नव्या रूपात छापली. हा आद्य

Read More …

कडवे हिंदुत्व हाती घेऊन निघालेल्या भाजपने गेल्या काही महिन्यांपासून देशात सर्वत्र ‘मोदी लाट’ आली असल्याचा आभास निर्माण केला असताना काँग्रेसला मागे सारून ‘आम आदमी’ने मोदींची उन्मादी घोडदौड रोखली. इतकेच नव्हे तर मोदित्वासाठी ‘दिल्ली दूर आहे’ असा स्पष्ट इशारा ‘आम आदमी’ने देणे, हा खरे तर गांधी-नेहरू यांनी रुजविलेल्या सर्वधर्मसमभाव आणि शांतिपूर्ण सहजीवनवादी प्रेरणांचा विजय

Read More …

विवेकनिष्ठ समाजनिर्मितीचे स्वप्न पाहणा-या संत आणि समाजसुधारकांचा महाराष्ट्राला वारसा आहे, परंतु गेल्या काही वर्षापासून सगळेच बिनसलेले दिसते आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाचा अद्याप तपास लागलेला नाही. ज्या सनातनी वृत्तीच्या लोकांनी डॉ. दाभोलकरांना मृत्यूनंतरही सोडले नाही तेच लोक आता अंधश्रद्धा किंवा जादूटोणाविरोधी विधेयकाची प्रक्रिया

Read More …

सध्या देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वेगाने वाढताना दिसताहेत. काही समाजतज्ज्ञांच्या मते शासन, प्रशासन आणि प्रसारमाध्यमांकडून महिलांविरोधी सर्वच घटनांची प्राधान्याने दखल घेतली जात असल्यामुळे जास्तीत जास्त अत्याचाराच्या घटनांची पोलिसांकडे नोंद होऊ लागली आहे. शासकीय आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षात बलात्कार आणि विनयभंगांच्या गुन्ह्यांमध्ये २० टक्के वाढ झालेली दिसते.

Read More …

आपल्या बहुभाषिक, बहुधर्मीय आणि विविधतेने नटलेल्या देशात सगळेच पक्ष राजकारण करताना आम लोकांच्या भाषिक, धार्मिक वा सांस्कृतिक अस्मितांचा वापर करताना दिसतात. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांनी संसदेत इंग्रजीचा वापर बंद करा, तेथे हिंदीची सक्ती करा, अशी मागणी करणे, हा अशाच भावनिक राजकारणाचा भाग आहे. काही आठवडयांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह

Read More …

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उच्चवर्णीयांमधून समाजाच्या सर्व थरांत जावा, यासाठी नजीकच्या चार-पाच दशकांत ज्यांनी प्रयत्न केले, त्या मोजक्या नेत्यांमध्ये विलासजी फडणवीस यांचे नाव घेता येईल. उत्तम संघटक, जिद्दीचा प्रचारक आणि प्रेमळ मार्गदर्शक असे बहुपेडी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणा-या विलासजींचे सात नोव्हेंबरला निधन झाले. त्यांच्या शोकसभेचे आयोजन नागपुरात सरसंघचालक डॉ. मोहनजी

Read More …

स्वातंत्र्यपूर्व काळात, मोगली आणि इंग्रजी सत्तेच्या कचाटयात देश सापडण्यापूर्वीपासून म-हाटी समशेरीने आणि अक्कलहुशारीने आपली चमक आणि धमक दाखवली होती. त्यामुळे ‘कोणताही’ पराक्रम करण्याची क्षमता असलेला हा मराठी समाज कायम संभ्रमावस्थेत राहावा, जेणेकरून उद्योग-व्यवसायापासून सत्तासंपादनाच्या महत्कार्यापर्यंत तो पोहोचू नये, यासाठी देशी – विदेशी सगळयाच सत्ताधा-यांनी प्रयत्न केले.

Read More …

विख्यात कवी पु. शि. रेगे यांच्या ‘सावित्री’ कादंबरीमध्ये लच्छी नामक मुलीची खूप मनोवेधक कहाणी सांगितली आहे. लच्छी आणि मोर ही रूपके वापरून पु. शि. आपल्याला सुचवितात की, ‘तुम्हाला मोर पाहिजे असेल तर तुम्ही स्वत:च मोरस्वरूप होऊन गेले पाहिजे.’ सचिन तेंडुलकर याचे क्रिकेटप्रेमही अगदी त्या लच्छीच्या मोरप्रेमासारखे मनस्वी, यशस्वी आणि ओजस्वी. आणि म्हणूनच असेल कदाचित सचिनच्या संपूर्ण

Read More …

आपल्या देशात निवडणुका जवळ आल्यावर धर्म, प्रादेशिकवाद, महापुरुषांचे नव्याने स्मरण आदी गोष्टींना अक्षरश: ऊत येतो. सगळेच राजकीय पक्ष आणि राजकारणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असणा-या संघटनांना तर नवनवे वादविषय उकरून काढण्याची संधीच हवी असते. यापूर्वी राष्ट्रीय राजकारणात असे वादग्रस्त विषय काढून वातावरण तणावग्रस्त करणारे होतेच; पण त्यांचे राजकीय स्थान नरेंद्र मोदी यांच्याएवढे

Read More …

इसवी सन पहिल्या ते पंधराव्या शतकापर्यंत भारत अक्षरश: सुवर्णभूमी म्हणूनच ओळखला जात होता. येथील सुबत्ता आणि संपत्तीच्या सुरस कथांनी युरोपियन जग भारताकडे आकर्षित झाले. मायकल एडवर्ड्स यांनी ‘अ हिस्ट्री ऑफ इंडिया’ या ग्रंथात पोर्तुगाल आणि इंग्लंडची पावले आपल्या देशाकडे कशी वळली, याचा सुरेख मागोवा घेतला आहे. एडवर्ड्स लिहितात, पंधराव्या शतकात पोर्तुगीज सत्ताधारी पोपच्या आशीर्वादाने

Read More …

बाळासाहेबांच्या अनुपस्थितीतील पहिल्याच दस-या मेळाव्यात अत्यंत वाईट पद्धतीने अपमानित होऊन मनोहरपंतांना व्यासपीठावरून खाली उतरावे लागले. 

Read More …

कुणाला गावातील आपुलकीची हवा आवडलेली, तर कुणाच्या डोळ्यात गावची आभाळस्वप्ने दडलेली.. त्यामुळे अत्यंत निकड असल्याशिवाय कुणी गाव सोडत नाही आणि परिस्थितीच्या रेटयाने जरी त्या माणसाने गाव सोडले, तरी आठवणींच्या हातांनी त्याला जखडलेला गाव त्याची पाठ सोडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशाच गावप्रेमाने भारलेल्या १०१ मान्यवर मराठी ‘प्रतिभावंतां’नी ‘प्रहार’च्या ‘वाडीवस्ती’ या लेखमालेत

Read More …

जगभरातील सोळा शहरांमध्ये घेण्यात आलेल्या प्रामाणिकपणाच्या चाचणीत आपल्या मुंबईने दुसरा क्रमांक मिळवला आहे. मुंबईवर प्रेम करणा-या सर्वच लोकांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. एरवी नको त्या गुन्हयांसाठी चर्चेत असणा-या मुंबईच्या या प्रामाणिकपणाचा प्रत्यय अनेकदा रिक्षा-टॅक्सी चालवणा-यांच्या वस्तू, पैसे, सोने परत करण्याच्या कृतीतून येत असतो. मुंबईकरांचा हा चांगुलपणा आणि कोणत्याही स्थितीत

Read More …

जगातील सगळयाच देशांमध्ये राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, अपवाद फक्त भारताचा. आपला देश स्वतंत्र होईपर्यंत लक्षावधी लोकांनी प्राणत्याग – स्वार्थत्याग करून लढा दिला. मध्यमवर्ग या सगळ्या लढाईत पुढे होता. अगदी सत्तरच्या दशकापर्यंत भारतीय समाजमनाला दिशा दाखवण्यासाठी लेखक, विचारवंत, संपादक, प्राध्यापक, डॉक्टर्स आणि समाजसेवकांनी भरलेला मध्यमवर्ग पुढे असे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर

Read More …

गणपती, म्हणजे गणांचा, लोकांचा नेता. हा लोकनायक ‘सकळविद्यांचा अधिपती’ आहे. ज्ञानी असला, पराक्रमी असला तरी विनम्र आहे. तो लोकांना तापदायक ठरणा-या असुरांचा नायनाट करतो, म्हणून त्याला ‘विघ्नहर्ता’ म्हणतात. त्याचे दर्शन, मार्गदर्शन सगळ्या लोकांना सुखदायी असायचे म्हणून तो सुखकर्ता आणि मंगलमूर्ती म्हणून ओळखला जातो. मनासारख्या चंचल असणा-या उंदराला त्याने आपले वाहन केल्यामुळे तो

Read More …

प्रत्येक देशाची ‘मुद्रा’ हा त्या देशाचा ‘चेहरा’ असतो. भारतीय मुद्रेचं डॉलरच्या तुलनेतलं पतन ही वित्तीय क्षितीजावरची अतिशय गंभीर बाब असली तरी या समस्येचा मुद्राराक्षस नियंत्रणाखाली आणण्यासाठी वित्तक्षेत्रातील तज्ज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या लोककल्याणकारी कार्यक्रमांच्या ओझ्यामुळेच या मुद्रापतनाला आणि शेअर बाजारातील हिंदोळ्यांना चालना

Read More …

डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमी होत आलेली किंमत, हा सध्या सर्वच भारतीयांच्या चिंतेचा विषय बनला आहे. जागतिक स्तरावर झालेल्या आर्थिक उलाढालींमुळे रुपया घसरला हे मान्य. परंतु १९४७ साली डॉलरच्या बरोबरीने असलेला रुपया जेव्हा स्वातंत्र्याला सहा दशके उलटल्यानंतर एक डॉलरला साठ रुपये होतो, तेव्हा आमच्या आर्थिक नियोजनाचे अपयश ठळकपणे समोर येते. भारतात मोगल राजे राज्य करत होते, तेव्हाही

Read More …

बुद्धगयेतील बोधीवृक्ष आणि वज्रासन यांना बौद्ध धर्मात खूप महत्त्व आहे. अवघ्या दीड महिन्यापूर्वी वैशाख पौर्णिमेला बुद्धगयेत लाखो लोक दर्शनासाठी गोळा झाले होते. साधारणत: त्याच सुमारास आपल्या केंद्रिय गुप्तचर विभागाने बुद्धगयेत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्धधर्मीय आणि मुस्लिमांमधील संघर्षाची पार्श्वभूमी या स्फोटांना असल्याचे बोलले

Read More …

भारत स्वतंत्र झाला, त्या वेळी पहिले पंतप्रधान पंडित नेहरू म्हणाले होते, ‘विकासाच्या वाटेवर शेती उद्योगाने मागे पडून चालणार नाही.’ १९४८ मध्ये महात्मा गांधी यांनी ‘गरिबांच्या भाकरीतच भगवान आहे,’ असे गर्जून सांगितले होते. पंडितजींच्या नंतर पंतप्रधानपदी आलेल्या लालबहादूर शास्त्री यांनी आठवडयातून एक वेळ उपवास करून, गरिबांबद्दल वाटणारी सहानुभूती कृतीने व्यक्त केली होती. या महानायकांच्या

Read More …

भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला अत्यंत महत्त्व आहे. आमचे तुकाराम महाराज तर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ असे म्हणतात. नदीला ‘गंगा मैया’, तर जमिनीला ‘धरती माता’ मानणारे भारतीय दूध देणाऱ्या गायीलाही देवत्व देतात; परंतु प्रत्यक्षात आमच्या देशातील प्रत्येक नदी प्रदूषित झालेली दिसते. जगातील कोणत्याच देशात होत नसेल एवढी जमिनीची प्रचंड धूप फक्त भारतातच होते. एवढेच नाही तर आम्ही आमच्या

Read More …

पर्यटन हा आजकाल अत्यंत किफायतशीर आणि अनेकांच्या हाताला काम मिळवून देणारा व्यवसाय बनत चालला आहे. निव्वळ पर्यटनावर राज्यातील किंवा देशातील लोक चांगले जीवन जगू शकतात, याचे उदाहरण स्वित्झर्लंडलडने जगासमोर सादर केले. त्यापाठोपाठ छोटया-छोटया देशांनीही आपल्याकडील चांगल्या गोष्टींचे योग्य ‘मार्केटिंग’ करून जगातील जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडे खेचण्याचा गेल्या तीन-चार दशकांत जणू

Read More …

ग्लोबल एडिटर्स नेटवर्क परिषदेत पत्रकारितेशी संबंधित अनेक नवनवीन संकल्पनांवर व्यापक आणि रंजक विचारमंथन होत आह

Read More …

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ‘ग्लोबल एडिटर्स नेटवर्क’ परिषदेमध्ये गुरुवारी ‘डेटा जर्नलिझम अ‍ॅवॉर्ड’ या पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाली. झपाटयाने विस्तारत चाललेल्या पत्रकारिता क्षेत्रात अचूकता आणि प्रावीण्याचे महत्त्व लक्षात घेऊन आकडेवारीच्या आधाराने होणा-या पत्रकारितेबद्दल दिले जाणारे अशा प्रकारचे हे एकमेव आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत.

Read More …

हल्ली शोधपत्रकारिता बहुतेक संघटनांमधून लोप पावत चालली आहे. काही मोजके शिलेदार मात्र या क्षेत्रात अजूनही किल्ला लढवत आहेत. अशीच एक संघटना म्हणजे अमेरिकेतली ‘प्रोपब्लिका

Read More …

ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संशोधन संचालक रॉबर्ट पिकार्ड यांनी ड्रोन पत्रकारितेचे विविध कंगोरे उलगडून दाखवले.

Read More …

फ्रान्सच्या राजधानीत उतरल्यानंतर पहिल्यांदा भावली ती येथील आल्हाददायक हवा. ‘ग्लोबल एडिटर्स नेटवर्क’ या संघटनेतर्फे आयोजित तीन दिवसांची भरगच्च कार्यक्रमांची परिषद बुधवारपासून सुरू होत आहे. त्यासाठी गेले दोन दिवस पॅरिसनगरीत उतरत असलेल्या प्रतिनिधींसाठी जणू उत्तम वातावरणनिर्मितीच झालेली दिसते! येथील हॉटेल दा व्हिल येथे तीन दिवस ही परिषद होत आहे. ही वास्तू म्हणजे पॅरिसची मुख्य

Read More …

मध्यंतरी आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या विविध एफ. एम. चॅनेल्सवर एक काव्यात्म जाहिरात प्रसारित केली जायची. ‘शुभवाणी, लाभवाणी, आकाशवाणी’ कोणत्याही व्यावसायिकाला आवडेल अशी ‘शुभ-लाभ’ या व्यापारी वर्गाच्या आवडत्या प्रतीकांची गुंफण करून ती जाहिरात केली गेली होती.. परवा लालकृष्ण अडवाणी यांच्या नाराजीनामा नाटयाच्या सुमारास ती जाहिरात पुन्हा आठवली. संघ परिवार व भाजपमध्ये असलेल्या

Read More …

मराठी भाषा म्हणजे काय, असा प्रश्न कुणी विचारला, तर माझे उत्तर असेल.. मराठी म्हणजे ज्ञानोबांची ओवी, तुकोबांची वाणी, छत्रपतींची तलवार आणि चक्रधरांचे भाषण धारदार. मराठी म्हणजे एकनाथांचे भारूड, नवनाथांचे गारुड, मराठी संताजी-धनाजीची स्फूर्ती, मराठी सावरकरांची कीर्ती, मराठी महन्मंगल मूर्ती शारदेच

Read More …

‘अ‍ॅग्रिकल्चर इज कल्चर ऑफ इंडिया’ म्हणजे शेती ही भारताची संस्कृती आहे, असे म्हटले जाते. पूर्वी ती वस्तुस्थिती होती. आता ती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. शंभर वर्षापूर्वी इंग्रजांनी सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असणारी ग्रामस्वराज्याची व्यवस्था मोडून काढली होती. तरीही ‘उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी’ असेच मानले जात असे. आज २१ व्या शतकात, ‘उत्तम नोकरी, मध्यम धंदा आणि कनिष्ठ

Read More …

इंटरनेट ही आज आपल्याला नवी नसलेली संकल्पना फक्त २० वर्षापूर्वीच लोकांसाठी खुली झाली. ३० एप्रिल १९९३ रोजी अधिकृतपणे ‘वर्ल्ड वाइड वेब’ अर्थात माहितीचे महाजाल लोकांसाठी खुले झाले. सर्वसामान्य माणसाला ज्ञानाचा अधिकारी बनवणारी ही घटना जागतिक इतिहासात अत्यंत महत्त्वाची आहे. अग्नी, चाक, छपाईयंत्र आणि आता इंटरनेट या शोधांनी मानवी जीवनाला, वर्तनाला आणि एकूण लोकव्यवहाराला वेगळी

Read More …

भारत स्वतंत्र झाला त्या वेळी आनंदित झालेल्या करोडो भारतीयांचा आत्मस्वर बनून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘हा नियतीशी करार आहे’, असे उद्गार काढले होते. भारताला प्रगतिपथावर नेण्याचा तो निर्धार आजही कायम असला, तरी त्यामागील सर्वागीण प्रगतीचा उद्देश फसला आहे. त्यामुळे आमचे नेते भलेही भारताला अमेरिका, मुंबईला शांघाय किंवा सिंगापूर वा अन्य काही करायचे म्हणत असतील; पण आम्ही तसे

Read More …

‘बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी’ या म्हणीची वारंवार आठवण यावी, अशी मारामारी सध्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सुरू आहे. भाजपमधील लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांसह किमान अर्धा डझन नेते पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, तर दुसरीकडे ‘डॅशिंग’ नरेंद्र मोदी आपणच पंतप्रधानपदासाठी कसे योग्य आहोत, याचा प्रचारही करायला लागलेले दिसतात. बड्या

Read More …

‘विद्येविना मति गेली’ असे सांगत ‘वित्ताविना शुद्र खचले’ आणि हे ‘इतके अनर्थ एका अविद्येने केले’ अशी जाणीव-जागृती करणा-या महात्मा फुले यांना गुरू मानून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक-आर्थिक आणि राजकीय दास्यात अडकलेल्या अज्ञानी दलितांना ‘ज्ञानमार्गी’ केले होते. म्हणून भारतात सामाजिक स्थित्यंतराच्या चक्राला गती लाभली. महात्मा गांधी यांनी याच विषयासंदर्भात खूप समर्पक विवेचन

Read More …

आपल्या देशात टोकाचे दारिद्रय आणि ‘अँटिलिया’च्या उंचीची श्रीमंती आहे. त्यामुळे जगातील पहिल्या दहा धनाढयांमध्ये जशी भारतीय नावे आहेत, तद्वत विश्वातील सर्वात जास्त दरिद्री – भुकेकंगाल आपल्याच देशात आढळतात. हा विरोधाभास सर्वच क्षेत्रांत ठळकपणे प्रकट करण्याची जणू स्पर्धाच लागलीय. सिनेमा आणि दूरदर्शनवरील विविध वाहिन्यांवर जसे चकचकीत – चमचमीत कार्यक्रम पाहण्यास मिळतात, तद्वत

Read More …

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या दलितमुक्तीच्या प्रयोगांनी शतकानुशतके दु:ख-दारिद्रयाच्या खाईत पडलेला मागासवर्गीय समाज माणसात आला. समाज परिवर्तनाच्या या लढाईमुळे भारतातील उपेक्षित वर्गाला आत्मभान मिळाले, हे अवघे जग जाणते. त्यामुळेच असेल कदाचित डॉ. आंबेडकरांना त्यांच्या हयातीतच देवदुर्लभ लोकप्रियता लाभली. ती आजही कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जेव्हा आनंद

Read More …

महाराष्ट्राला सुसंस्कृत आणि समंजस लोकनेत्यांची परंपरा आहे. थोर विचारवंत असलेले बाळासाहेब भारदे हे त्या परंपरेतील अत्यंत महत्त्वाचे नाव. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर विधानसभेचे सभापती झालेल्या भारदेबुवांनी ‘विधानसभा हे लोकशाहीचे महामंदिर आहे. जनताजनार्दन हीच त्याची स्वयंभू सार्वभौम देवता! प्रतिनिधी हे त्या देवतेचे उपासक!’ या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या;

Read More …

महात्मा गांधी आणि त्यांच्या अनुयायांनी स्वातंत्र्यचळवळ चालवता चालवता भारतातील मागासलेल्या आणि पिढयान्पिढया दारिद्रयाच्या खाईत खितपत पडलेल्या उपेक्षितांचे अंतरंग जाणले आणि त्यांना माणसांत आणण्याचे प्रयत्न केले. ठक्करबाप्पा, महर्षी कर्वे, ताराबाई मोडक, आचार्य भिसे गुरुजी, चित्रे गुरुजी अशा एकाहून एक महान त्यागी लोकांची शांततामय सेनाच जणू दारिद्रय, दु:ख आणि अज्ञानाविरुद्ध

Read More …

चालणे ही प्रक्रिया तशी पाहिली तर अत्यंत साधी, पण आदिमानव जेव्हा चालण्याचे तंत्र शिकला तेव्हापासूनच ख-या अर्थाने मानवजातीच्या सर्वागीण विकासाला गती आली. हल्ली रस्ते गाडयावाल्यांच्या ताब्यात गेल्याने मात्र रस्त्यावर चालणे धोकादायक आणि कंटाळवाणे बनलेले दिसते. ‘जो चालतो, त्याचे नशीबही चालते’ अशी एक जुनी म्हण आहे. म्हणूनच महात्मा गांधी, विनोबाजी आवर्जून सांगायचे, ‘चरैवैती,

Read More …

अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांनी महिलांना सक्षम करण्याची प्रतिज्ञा केली आहे. मुली, तरुण आणि तमाम गरिबांकडे लक्ष देण्याचा मनोदय व्यक्त करून चिदंबरम यांनी महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा ही सामूहिक जबाबदारी असल्याचे जाहीर केले आहे. शासनाची ही प्रामाणिक भूमिका लोकांच्या हिताची आहे; परंतु लोककल्याणासाठी अफाट खर्च करताना आमच्या नियोजनकर्त्यांनी समाजस्वास्थ्य

Read More …

‘राष्ट्रवाद’ ही संकल्पना राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येशी मिळतीजुळती आहे. जागतिकीकरणाने आता राष्ट्रीय सीमा तोडून अवघे जग एकत्र आणलेले दिसते. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या न्यायाने ‘लोकल टू ग्लोबल’ असा एक सांस्कृतिक परीघ निर्माण होताना दिसतोय. ही अठराव्या शतकातील औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून सुरू झालेली आधुनिकीकरणाची प्रक्रिया आता ख-या अर्थाने स्थिरावतेय. या सगळ्या प्रक्रियेत महाराष्ट्राला

Read More …

‘नेमेचि येतो पावसाळा’ ही जशी म्हण सर्वश्रृत आहे, तद्वत पावसाळा आला की मुंबईतील सफाई कर्मचा-यांचा संप ठरलेलाच. विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या तोंडावर विद्यापीठ वा शाळेतील गुरूजन संपावर जाणारच. जणू संपासारख्या ‘हट्टवादी’ धाग्याने रस्त्यावर साफसफाई करणारा अल्पशिक्षित कामगार आणि विद्यापीठातील प्राध्यापक यांना एका पंक्तीत बसवले आहे. वैयक्तिक हक्कांच्या आग्रहासाठी शिक्षण हे

Read More …

गेल्या दोनशे-चारशे वर्षापासून गरिबी हा जणू भारताच्या माथ्यावरील कलंक बनला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर परिस्थिती बदलेल, अशी आशा होती.. पण आमच्या प्रगतीची गती मंदच राहिली. आमच्यापेक्षा वाईट परिस्थितीचा सामना केलेल्या चीन, दक्षिण कोरिया, मेक्सिको, इस्रायल, सिंगापूर आदी छोट्या-मोठ्या देशांनी गेल्या तीन-चार दशकांत नजरेत भरावी अशी भरारी मारली. आपली मात्र रांगत आणि रांगेत वाटचाल

Read More …

आपल्याकडे रस्त्यावर होणा-या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रस्ते जणू काही ‘मृत्यूचे सापळे’ बनले आहेत. चुकीच्या पद्धतीने आखलेले आणि सदोष पद्धतीने बांधलेले महामार्ग वेगवान वाहनचालकांसाठी मृत्यूचे मार्ग ठरत आहेत. आपल्या देशात दरवर्षी एक लाख ३६ हजारहून अधिक लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. त्यापैकी निम्मे लोक मोटारीत प्रवास करणारे तर साधारणत: ४६ टक्के मृत होणारे

Read More …

सेक्स हे सगळ्या मनोविकारांचं मूळ आहे, हे सांगणा-या सिग्मंड फ्रॉइडचं आकलन आजच्या आपल्या समाजाने करण्याची किती गरज आहे, हे सध्या भवताली घडणा-या घटनांवरून दिसून येतंय. मानवी हिंसक मनोवृत्तीमागे कामक्षुधा कारणीभूत असते, हे सांगणाराही फ्रॉइडच. या पार्श्वभूमीवर आमच्या तरुणाईची ‘कामक्षुधा’ भडकावणा-या सगळ्याच माध्यमांची आम्ही नव्याने मांडणी करणं आजच्या काळाची गरज आहे. ‘बीपी’

Read More …

वीस वर्षापूर्वी देशातील अवघ्या १५ जिल्ह्यांमध्ये असलेला माओवाद आज एक तृतीयांश म्हणजे सुमारे २०० जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. नक्षली कारवायांचा उपद्रव असलेल्या राज्यांची संख्या आज १७ झाली आहे. देशाच्या निमलष्करी दलाची मोठी शक्ती या बंदोबस्तासाठी खर्ची पडत आहे. गेल्या वर्षात हरक, गुंडेती शंकर, मन्गु पद्दम, विजय मडकम, सिद्धार्थ बुरागोहेन, अजय गन्जु, स्वरूपा, समिरा, अमीला, अरुणा

Read More …