Mahesh Mhatre


वाढत्या लोकसंख्येला अन्न, पाणी आणि निवारा देणे ही कल्याणकारी राज्यव्यवस्थेची प्राथमिक जबाबदारी असते. निसर्गाच्या प्रकोपाने, अस्मानी आपत्तीने जेव्हा सामान्य लोक होरपळून जातात, त्यावेळी शासन नावाची व्यवस्था त्यांच्या मदतीला धावते. जेव्हा शासन अस्तित्वात नव्हते, त्यावेळी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज वा दामाजीपंतासारखे महापुरुष लोकांच्या उपयोगी पडले. पुढे छत्रपती शाहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड या ‘लोकांच्या राजां’नी लोकोपयोगी कामे करून निसर्गाच्या आक्रमणाला थोपवून धरले होते. आज पुन्हा अवर्षण- पाणी टंचाईच्या गर्तेत महाराष्ट्र सापडला आहे. शेतातील पिकांवर, गोठ्यातील गुरांवर आणि तारातील भाकरीवर अवर्षणाची अवकृपा झाल्याने खेड्यापाड्यातील म-हाटमोळी जनता हवालदिल झाली आहे. ज्या गावात पाणीटंचाई असते, भारनियमन असते, त्या गावातल्या मुलांशी लग्न करायला मुली तयार नाहीत, सरकारी कर्मचा-यांना तिकडे बदली नको असते. आपल्या वयस्कर आई-वडिलांना सोडून दरवर्षी हजारो बेकार शहराकडे धाव घेताना दिसतात. हे सामाजिक वास्तव मन अस्वस्थ करणारे आहे.


Read More …


भारताला स्वातंत्र्य मिळून सहा दशके उटलली, तरी शिक्षणासारख्या मूलभूत क्षेत्रात आम्ही आमूलाग्र बदल केलेले नाहीत. इंग्रजांनी आपला राज्यकारभार सुरळीत चालावा यासाठी कारकूननिर्मितीचा अभ्यासक्रम आणला होता. दहावी, बारावी आणि नंतर पदवी हा ‘मेकॉले पॅटर्न’ आजही त्याच पद्धतीने सुरू आहे. ज्याप्रमाणे बोराच्या झाडाला आंबे लागू शकत नाहीत, त्याप्रमाणेच कारकून तयार करण्याच्या ‘फॅक्टरी’मध्ये संशोधक विचारवंत, कलावंत तयार होणे अशक्य. चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी विद्येच्या उपासनेत रमणा-या, संशोधनासाठी झोकून देणा-या आणि ज्ञानप्राप्तीसाठी अन्य सगळ्या प्रलोभनांकडे पाठ फिरवणा-या ज्ञानी, प्रतिभावंतांची गरज असते. प्रतिभावान लोकांची शाळा-महाविद्यालयांतून जडणघडण होते, त्यामुळे ज्या देशात अशा उत्तम शैक्षणिक संस्था असतात ते देश सर्वच क्षेत्रात प्रगती करतात. युरोप-अमेरिका असो वा आपल्या मागून पुढे चाललेला चीन, या सगळ्या देशांनी पद्धतशीरपणे शिक्षणाची कास धरली म्हणून त्यांचा अवघा समाज सुधारला. पाश्चात्यांच्या फॅशन्सचे, व्यसनांचे अनुकरण करणा-या आम्हा भारतीयांनी त्यांची ज्ञानोपासना, कामावरची निष्ठा आणि तत्त्वासाठी प्राण देण्याची तयारी या त्रिसूत्रीचे अनुकरण केले तर.. भारत नक्कीच महासत्ता बनेल!

Read More …


माणूस असो वा राष्ट्र, ऊर्जेशिवाय या जगात कोणाचीच प्रगती होत नाही. आज आपल्या राज्यात, देशात वीजटंचाईने कहर माजवला आहे. ती टंचाई दूर करण्यासाठी अणुऊर्जेशिवाय दुसरा पर्याय नाही, हे सिद्ध होत आहे. एकेकाळी विनाशाचे प्रतीक बनलेली अणुभट्टी जर विकासाला जन्म देणार असेल, तर भारतासारख्या देशाने या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे अणुऊर्जेने आपल्यासमोर स्वस्त आणि स्वच्छ वीजनिर्मितीचा पर्याय खुला करून र्सवकष विकास दृष्टिपथात आणला आहे. या आधी जगात युद्धाला, अणुबॉम्बला विरोध करणा-या संघटना दिसत. हल्ली त्याच स्टाईलने काही सुपारीबाज संस्था-संघटना परकीय एजंटांकडून लाच घेऊन जैतापूर वा कुडानकलमला विरोध करताना दिसतात. ही गोष्ट संतापजनक आहे. या प्रवृत्तींना वेळीच लोकांनी रोखले पाहिजे, तरच विकासाची गंगा तळागाळातल्या लोकांपर्यंत जाईल..

Read More …