Mahesh Mhatre

२०१२ संपून २०१३चा प्रारंभ होत आहे. एकविसाव्या शतकातले हे पहिले तप होते. ते संपून दुस-या तपात प्रवेश करताना मनात उमटणारा प्रश्न असा की, आपण या तपभरात काय मिळवले आहे. याचे उत्तर शोधताना असे लक्षात येते की, जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणा-या आपल्या देशाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. यासाठी आजच्या तरुणांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्रांत स्वत:ला गाडून तपश्चर्येला सुरुवात

Read More …

एकटया-दुकटया तरुणीची छेडछाड, विनयभंग, बलात्कार, अपहरण आणि खून या प्रकारांना सध्या देशभरात अक्षरश: ऊत आला आहे. स्त्रीकडे बघण्याचा परंपरागत दृष्टिकोन हे याचे सगळ्यात मोठे कारण आहे. शिक्षणाने स्त्री समर्थ झाली तरी ती म्हणजे उपभोगाचे साधन, मूल देणारे यंत्र, फुकट राबणारी नोकर हाच संकुचित आणि अमानुष विचार आपल्या समाजाने वर्षानुवर्षे केला. त्यातून स्त्रीचे प्रत्येक टप्प्यावर

Read More …

आपल्या कृषिप्रधान देशात शेती आणि पूरक व्यवसायासाठी मनुष्यबळ अत्यंत महत्त्वाचे होते. एकत्र कुटुंबपद्धतीचा उगम त्या गरजेत होता. एकत्र कुटुंबपद्धतीत ज्येष्ठांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा फायदा होत होता. म्हणून ज्येष्ठांच्या शब्दाला मान होता. स्वातंत्र्यानंतर देशातील शेतीवर आधारित ग्रामीण समाजव्यवस्था पूर्णपणे विस्कटली आणि शिकलेला प्रत्येक मुलगा शेती, कुटुंब आणि ग्रामीण जीवनापासून

Read More …

आधुनिक पत्रकारितेला चटकदार गेयगतीच्या शीर्षकांची नव्याने ओळख करून देणारे आणि जाहिरातक्षेत्राला देखणी मराठी शब्दकळा बहाल करणारे वसंत सोपारकर आज आपल्यात नाहीत. त्यांचे चिरंजीव आदित्य सोपारकर यांनी त्यांच्या आयुष्यावर ‘सो’ हे शब्दचित्रमय पुस्तक सादर केलंय. त्यानिमित्ताने वसंतकाकांना ही शब्दपुष्पांजली

Read More …

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जाणारा आमचा देश भविष्यात आर्थिक महासत्ता होईल, अशी आशा लावून बसलेल्या मध्यमवर्गीयांचा आता अपेक्षाभंग होऊ लागला आहे. त्यांच्या बुद्धिमान पोरा-बाळांनी कधीच इंग्लंड-अमेरिकेची वाट धरलेली आहे. जे देशात उरलेत त्यांनी या देशात जे काही आहे, ते वाईट, त्याज्य आहे, अशी भूमिका घेतलेली आहे. संख्येने कमी असणारा, जातीय आधार नसलेला हा वर्ग अल्पसंख्य

Read More …

सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होऊन 119 वर्षे उलटली आहेत. महाराष्ट्रातील लोकांमध्ये राजकीय जागृती आणि राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी, या हेतूने लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले होते. पण काळाच्या ओघात गणेशोत्सव बदलत, बदलत ‘गणेश फेस्टिव्हल’ झाला. उंच मूर्ती, भपकेबाज आरास आणि नवसाला पावणारा, अशी जाहिरात यामुळे सार्वजनिक गणपतींच्या दर्शनाला येणा-यांच्या रांगा

Read More …

बालपणीचा काळ सुखाचा, ही म्हण आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर दिसत आहे, कारण बालपणातील बालसुलभ निरागसताच हरवत चालली आहे. पुण्याच्या ‘रिव्हर व्ह्यू’ रिसॉर्टवर मद्यधुंद अवस्थेत सापडलेल्या 750 ते 800 अल्पवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या वर्तनाने आपण ‘लहान’ राहिलो नसल्याचे जाहीर केले आहे. आठवी ते बारावी या अभ्यासाच्या, करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या इयत्तांमध्ये

Read More …

‘महाराष्ट्र’ या नावातच महानता दडलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रधर्म, छत्रपती शिवाजी महाराजांना थोरले महाराज, शहाजीराजांनी शिकवला तेव्हापासून त्यातील महान तत्त्वांचा म-हाटमोळ्या लोकांना चांगलाच परिचय झाला आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा। प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा॥’ हे महाराष्ट्र गीत लिहिताना म-हाटी मनांचा महाउद्गारच व्यक्त केला होता. त्या

Read More …

सीएनएन-आयबीएन आणि हिस्टरी चॅनल तसेच ‘आऊटलुक’ साप्ताहिकातर्फे ‘गांधीजीनंतरचा सर्वश्रेष्ठ भारतीय कोण?’ अशी एक भली मोठी स्पर्धा घेतली गेली. लोकांना शंभर मान्यवर भारतीयांमधून एकाची निवड करण्यास सांगण्यात आले होते. त्यात भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वाधिक मते मिळाली आणि त्यांना सर्वश्रेष्ठ भारतीय घोषित करण्यात आले. आम्हाला हा एकूण प्रकारच

Read More …

‘युवा’ हा शब्द उलट लिहिला की ‘वायू’ हा शब्द तयार होतो. विशेष म्हणजे, दोन्ही शब्दांमधून सारखाच अर्थ ध्वनित होतो. शक्ती, सामर्थ्य, चपळाई आणि नवनवोन्मेषशालि प्रतिभा म्हणजे तरुणाई. हे लखलखते तारुण्य आज अवघ्या भारतवर्षाला लाभले आहे. भारताचे आजचे सरासरी वय 25 आहे. पुढील 10 वर्षात या तरुणाईतून 40 कोटी बुद्धिमान तरुणांची फौज जगभरातील महत्त्वाच्या पदांवर आरूढ झालेली दिसेल, असे

Read More …

आमच्यातील प्रत्येक जण प्रथम आपल्या कुटुंबाचा, मग जातीचा, काही वेळा प्रांताचा तर कधी धर्माचा विचार करत असतो. अगदी जाती-धर्माचा, प्रांत-भाषेच्या अभिमानासाठी कोणतीही ‘लढाई’ लढायला तयार असतो. पण मी भारतीय आहे, मला माझ्या देशाचा पर्यायाने माझ्या देशबांधवांचा विकास करायचा आहे, असे म्हणणारे आणि मानणारे फार कमी दिसतात, हे आमच्या स्वातंत्र्याचे सर्वात मोठे अपयश आहे. 65 वर्षापूर्वी

Read More …

पाणी आणि वीज या दोन्ही गोष्टी आजच्या युगात अत्यावश्यक बनल्या आहेत. त्यांच्या उपलब्धतेमुळे जगणे सहजसोपे झालेले दिसते. परंतु, त्याची कमतरता जगणे अशक्य करू शकते, याचा अनुभव आपण सारे घेत आहोत. दुष्काळाने देशातील 12 राज्यांना घेरले असतानाच सलग दोन दिवस 22 राज्यांनी काळोखाचा ‘अनुभव’ घेतला.. तोंडचे पाणी पळवणाऱ्या आणि डोळ्यांसमोर अंधार आणणा-या या समस्यांशी लढण्यासाठी सरकारआधी

Read More …

‘युवा’ हा शब्द उलट लिहिला की ‘वायू’ हा शब्द तयार होतो. विशेष म्हणजे, दोन्ही शब्दांमधून सारखाच अर्थ ध्वनित होतो. शक्ती, सामर्थ्य, चपळाई आणि नवनवोन्मेषशालि प्रतिभा म्हणजे तरुणाई. हे लखलखते तारुण्य आज अवघ्या भारतवर्षाला लाभले आहे. भारताचे आजचे सरासरी वय 25 आहे. पुढील 10 वर्षात या तरुणाईतून 40 कोटी बुद्धिमान तरुणांची फौज जगभरातील महत्त्वाच्या पदांवर आरूढ झालेली दिसेल, असे

Read More …

शंभरी गाठलेल्या हिंदी सिनेमाने आजवर अनेक स्थित्यंतरे पाहिली. आरंभी तो पुराणांमध्ये रमला कारण तत्कालिन भारतीय समाजालाही पौराणिक चमत्कृतीचे आकर्षण होते. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी सिनेमाचे सामाजिक भान जागे झाले. त्यानंतर दर आठ-दहा वर्षानी हिंदी सिनेमा कात टाकून नवा अवतार धारण करताना दिसत गेला. आजही ही बदलाची प्रक्रिया सुरू आहे. या बदलत्या रूपातील हिंदी सिनेमाने सामाजिक

Read More …

‘स्वप्नवासवदत्ता’ हे भासाने सुमारे दोन हजार वर्षापूर्वी लिहिलेले नाटक आजही अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातील ‘कालक्रमेण जगत, परिवर्तमाना:’ हे वासवदत्ताच्या तोंडचे वाक्य तर ‘कालानुसार जगात परिवर्तन होत जाते’ या त्रिकालाबाधित सत्याचा उत्कट आविष्कार मानला जातो. सध्या काळ म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला ‘टाइम’ म्हटले जाते, तेच शीर्षक असणाऱ्या मासिकाला वासवदत्ताच्या वाक्याची

Read More …

‘कुणब्याच्या जन्मा जाशी तर पेरू-पेरू मरशी, वाघाच्या जन्मा जाशी तर तोलू-तोलू मरशी पन् काथोड्याच्या जन्मा जाशी तर जंगलचा राजा होशी’ अशी एक म्हण कातकरी जमातीत प्रचलित होती. तसे पाहायला गेल्यास सर्वच आदिवासी जमातींना आपल्या जंगलावरच्या स्वामित्वाबद्दल अभिमान असतो; परंतु इंग्रजांच्या आगमनापासून आदिवासींना जंगलातून हुसकावून लावण्यात आले आणि त्यांच्या जगण्याचा आधारच तुटला. 1861

Read More …

आपल्या जनतेचे जगणे आनंदमयी आणि आरोग्यदायी करणे हे सरकारचे पहिले कर्तव्य आहे. त्याचबरोबर आपला परिसर आणि पर्यायाने देश स्वच्छ आणि सुंदर ठेवणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. भारताच्या दुर्दैवाने सरकारी पातळीवर स्वच्छतेच्या विषयाकडे लक्ष दिले जात नाही आणि आम्हा भारतीयांना तर स्वत:च्या घरापलीकडे स्वच्छतेचा विचार करण्याची सवय झालेली नाही. परिणामी अस्वच्छ वातावरणामुळे आमच्या

Read More …

भाजपाची निर्मिती रा. स्व. संघाच्या जहाल हिंदुत्ववादी विचारातून झाली आहे, कम्युनिस्ट पक्षाच्या विविध गटांनी मार्क्‍स, लेनिन आणि माओच्या नावाने आपली दुकाने थाटली आहेत. राम मनोहर लोहिया यांच्या स्वप्नातील वर्गविहीन समाज निर्मितीचा प्रयत्न करणाऱ्या समाजवादी विचारसरणीचे तीन-तेरा वाजले आहेत. लालूप्रसाद यादव, नीतीशकुमार, उत्तरप्रदेशचे मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान आणि शरद

Read More …

यंदा आपल्या देशात तब्बल 25 कोटी टन इतके धान्य उत्पादन झाले आहे. शासकीय गोदामे अक्षरश: धान्याने ओसंडून वाहत आहेत. तरीही भारतात दररोज 7 हजार लोक उपासमारीने मरतात, ही वस्तुस्थिती मन अस्वस्थ करते. देशातील 11 कोटी टन धान्य पाऊसपाण्याने सडते, खराब होते, उंदरांच्या पोटात जाते; पण देशातील 23 कोटी लोक रोज उपाशीपोटी झोपतात. भाकरीचा चंद्र शोधण्यात त्यांची हयात जाते.. भारत सरकारने

Read More …

युगे अठ्ठावीस वीटेवर उभा असलेला पंढरपूरचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचे अराध्यदैवत आहे. आषाढी-कार्तिकीची वारी हा मराठीजनांचा कुळाचार आहे. दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय आणि नियंत्रणाशिवाय वारीचा सोहळा साजरा होतो. सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी ‘माझे जीवीची आवढी। पंढरपूरा नेईन गुढी’ असा निर्धार केला होता. माऊलींनी प्रगट केलेली ती इच्छा आजही चढत्या-वाढत्या

Read More …

वाढत्या लोकसंख्येला अन्न, पाणी आणि निवारा देणे ही कल्याणकारी राज्यव्यवस्थेची प्राथमिक जबाबदारी असते. निसर्गाच्या प्रकोपाने, अस्मानी आपत्तीने जेव्हा सामान्य लोक होरपळून जातात, त्यावेळी शासन नावाची व्यवस्था त्यांच्या मदतीला धावते. जेव्हा शासन अस्तित्वात नव्हते, त्यावेळी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज वा दामाजीपंतासारखे महापुरुष लोकांच्या उपयोगी पडले. पुढे छत्रपती शाहू महाराज,

Read More …

भारताला स्वातंत्र्य मिळून सहा दशके उटलली, तरी शिक्षणासारख्या मूलभूत क्षेत्रात आम्ही आमूलाग्र बदल केलेले नाहीत. इंग्रजांनी आपला राज्यकारभार सुरळीत चालावा यासाठी कारकूननिर्मितीचा अभ्यासक्रम आणला होता. दहावी, बारावी आणि नंतर पदवी हा ‘मेकॉले पॅटर्न’ आजही त्याच पद्धतीने सुरू आहे. ज्याप्रमाणे बोराच्या झाडाला आंबे लागू शकत नाहीत, त्याप्रमाणेच कारकून तयार करण्याच्या ‘फॅक्टरी’मध्ये

Read More …

माणूस असो वा राष्ट्र, ऊर्जेशिवाय या जगात कोणाचीच प्रगती होत नाही. आज आपल्या राज्यात, देशात वीजटंचाईने कहर माजवला आहे. ती टंचाई दूर करण्यासाठी अणुऊर्जेशिवाय दुसरा पर्याय नाही, हे सिद्ध होत आहे. एकेकाळी विनाशाचे प्रतीक बनलेली अणुभट्टी जर विकासाला जन्म देणार असेल, तर भारतासारख्या देशाने या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे अणुऊर्जेने आपल्यासमोर स्वस्त आणि स्वच्छ

Read More …

नक्षलवाद्यांनी आजवर परदेशी व्यक्तींना हात लावलेला नव्हता, त्यामुळे गेल्या आठवड्याभरात प्रथमच भारतातील नक्षलवादी कारवायांची जगभरातील प्रसिद्धीमाध्यमांनी दखल घेतलेली दिसते.

Read More …

भारत हा शेतीप्रधान देश आहे, तरीसुद्धा भारताच्या अर्थमंत्र्यांनी बजेट मांडण्यापूर्वी कधी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेला बोलवले आहे. त्यांच्यासमोरील प्रश्नांची चर्चा केली आहे, अशी बातमी आजवर कधी ऐकलेली नाह

Read More …

उद्या 23 एप्रिल. म्हणजेच ‘जागतिक पुस्तक दिन’. त्यानिमित्ताने पुस्तकं, त्यांचं वाचन, त्यांचा संस्कार आणि त्यांच्याकडून मिळणारा वारसा याविषयी चर्चा करणारा हा विशेष लेख..

Read More …